सोमवार, ९ एप्रिल, २०१२

dikshabhumi

दीक्षाभूमी 


वर्षानुवर्ष
धर्म-संस्कृती
रूढी-परंपरेच्या नावाखाली
गुलामगिरीच्या शृंखलेत जखडलेल्या
दिन दलित अस्पृश्यांना
तुझ्याच पवित्र मातीत
भीमान दाखविला
मुक्तीचा मार्ग
आणि नऊ कोटी मुखातून
निनादू लागला
स्वतंत्र, समता आणि बंधुत्वाचा
महामंत्र
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
म्हणून ....
हे दीक्षाभूमी
तू आम्हाला मातृभूमी इतकीच
प्रिय आहे










suryakantmkapshikar:            मेरा भारत महान ...

suryakantmkapshikar:            मेरा भारत महान ना स्वाभिमान आहे
 ना अभि...
:            मेरा भारत महान  ना स्वाभिमान आहे  ना अभिमान आहे प्रत्येकाच्या मनात नुसतीच घाण आहे मग मी कसे म्हणावे माझा भारत महान आहे ? ...

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

           मेरा भारत महान 
ना स्वाभिमान आहे
 ना अभिमान आहे
प्रत्येकाच्या मनात
नुसतीच घाण आहे
मग मी कसे म्हणावे
माझा भारत महान आहे ?
हि जात आहे
तो वर्ण आहे
हा पंथ आहे
तो धर्म आहे
चोहीकडे विषमतेचे
हे थैमान आहे
मग मी कसे म्हणावे
माझा भारत महान आहे ?
गरिबी आहे लाचारी आहे
भ्रष्टाचार अन बेरोजगारी आहे
भविष्य सगळ्यांचे
सगळे भयाण आहे
मग मी कसे म्हणावे
माझा भारत महान आहे ?
ना गांधी ना नेहरू
ना सुभाषचंद्र आहे
ना भगतसिंह आहे
ना बाबासाहेब आहे
आज जे नेते आहे
सर्व बेईमान आहे
मग मी कसे म्हणावे
माझा भारत महान आहे ?
चौकात भिकारी आहे
कार्यालयात अधिकारी आहे
संसदेत बसले आमुचे पुढारी आहे
प्रत्येकाच्या हातात
जनतेची मान आहे
मग मी कसे म्हणावे
माझा भारत महान आहे ?
जो बदमाश आहे जो चोर आहे
जो हरामखोर आहे
तो थोर आहे
मी प्रामाणिक आहे
पण लहान आहे
मग मी कसे म्हणावे
माझा भारत महान आहे ?
जर प्रत्येकाची शान आहे
जर प्रत्येकाला मान आहे
प्रत्येकाला इथे जर
मिळते वरदान  आहे
तर प्रत्येक जन म्हणेल
माझा भारत महान आहे
माझा भारत महान आहे 

बुधवार, २५ जानेवारी, २०१२

itihas

जो आपला इतिहास विसरतो तो आपला इतिहास कधीच घडवू शकत नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपला ,आपल्या समाजाचा, देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे .तरच आपले भवितव्य उज्जल आहे .अन्यथा समोर फक्त अंधकारच असेल .